14 August 2022

रक्तविर रक्ताचे नाते मजबूत बनवते.....

 रुग्णाला जगण्याचा रंग पाहू द्या  ! 

आवश्यक वेळी रक्तदाता होऊ या !!


रक्तविर रक्ताचे नाते मजबूत बनवते

     रक्तदानाची महती वर्णावी तेवढी कमीच आहे. आजच्या घडीला मानवी मूल्य कशी जोपासावी कुणालाही समजवावे लागत नाही. जीवाचे महत्व समजावून सांगणारे दान अशी ज्याची ओळख आहे ते म्हणजे रक्तदान.

     रक्तविर बहुउद्देशीय संस्था ही यवतमाळ जिल्ह्यातील झरी या दुर्गम तालुक्यातील मुकुटबन येथील युवकांनी सुरु केलेली एक रक्तदानाची दिव्य चळवळ आहे. जी धाग्याप्रमाणे माणसं जोडतात आणि नातं घट्ट करतात. महत्वाचे म्हणजे आपत्ती वेळी रक्ताविना जीव जाणाऱ्या रुग्णाचे प्राण वाचवितात. रुग्णाच्या मनात आयुष्याची नवी उमेद जागी करुन रक्तविर रुग्णाला जगण्याचा रंग दाखवते.

     गरजूंना जीवनदान देण्याच्या मुख्य हेतूने पेटविलेल्या दिव्य कुंडात आज लाखोंनी सहभाग नोंदविला आहे. दररोज लागणाऱ्या रक्ताची गरज रक्तविर आपल्या परीने रक्त देऊन रुग्णासाठी जीवनदाता ठरत आहे.

     रक्तदानाला सर्वश्रेष्ठ दान म्हणतात कारण रक्तदानाला  कुठलाही पर्याय उपलब्ध झाला नाही. याचे भान सर्वानीच ठेवायला हवे. रक्तासाठी माणुस इतर माणसांवर अवलंबून आहे म्हणून रक्तदान करणे महत्वाचे आहे. त्यासाठी समाजात सर्वव्यापी रक्तदानाची जनजागृती व्हावी, या हेतूचा झेंडा घेऊन निघणारी रक्तविरची जनजागृती लाखो युवकांना रक्तदाते बनवत आहे. 

    समाजासाठी काहीतरी करावं अशी अनेकांची इच्छा असते. पण त्यांच्यातले काहीजण मात्र खरोखरच उभे राहतात आणि आपल्याला महत्वाच्या वाटणाऱ्या एखाद्या कामासाठी झोकून देतात. लौकिक अर्थाने त्यांचं काम फार मोठं नसेलही कदाचित पण समाज पुढे जाण्याच्या प्रक्रियेत तो खारीचा वाटा खुप महत्वाचा असतो. अशा प्रत्येक सेवाव्रतींना रक्तविर बहुउद्देशीय संस्था मानाचा मुजरा अर्पण करते. 

     पैसे सारेच कमवतात मात्र त्यातून समाधान कुणाला किती मिळते. हा संशोधनाचा विषय ठरतो. म्हणून आपण केवळ पैसाच नव्हे, तर समाधान मिळवण्यासाठी जगायला पाहिजे. आणि याच जगण्यात कायम मोकळेपण असतो. अशांना रक्तविर सदैव सलाम करत आले आहेत.

        रक्तवीर बहुद्देशीय संस्थेच्या प्रफुल भोयर यांच्या कार्याला व त्यांच्या स्वयंलिखित रक्तदान जनजागृती विषयक लिहिलेल्या "विश्वात्मक औदार्य रक्तपेढी एक वरदान" या श्री वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालय रक्तपेढी यवतमाळ यांच्या कार्याची गौरवगाथा तसेच जनजागृतीपर असलेल्या पुस्तकाला प्रफुल यांनी महाराष्ट्र समृद्ध व संपन्न करण्यासाठी कटीबद्ध असलेल्या सर्व सजग व सुजाण नागरिकांना समर्पित केले आहे.   

      भगत सिंह कोश्यारी( राज्यपाल महाराष्ट्र राज्य ), मा. बच्चूभाऊ कडू राज्यमंत्री, राज्य रक्त संक्रमण परिषद मुंबई चे सहाय्यक संचालक डॉ. अरुण थोरात, माननीय आमदार मदन येरावार, कालिंदाताई पवार, तसेच जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, उपजिल्हाधिकारी ललीतकुमार वऱ्हाडे, तहसीलदार कुणाल झाल्टे, पोलीस कल्याण शाखेचे पी. व्ही. फाडे, जिल्हा युवा अधिकारी सारंग मेश्राम, नितीन मिर्झापुरे, बिपीन चौधरी तसेच प्रत्यक्ष रक्तदात्यांच्या शुभेच्छा सह रक्तवीरांच्या कार्याला सर्वांचा पाठिंबा आहे. 

          प्रफुल भोयर यांनी रक्तवीरांच्या जनजागृतीला आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचविण्यासाठी विशेष प्रयत्न केले. आज रोजच्या लागणाऱ्या रक्ताची गरज पाहता शेकडोच्या संख्येने रक्तदाते तयार ठेवावे लागते, असे प्रफुल भोयर सांगतो.

          अनेक पुरस्काराने सन्मानित झालेल्या प्रफुल भोयर यांच्याकडे असलेल्या कल्पनाशक्तीच्या जोरावर ते व्यापक जनजागृती मोहीम राबवित आहे.

        स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त रक्तविर बहुद्देशीय संस्थेच्या प्रफुल भोयर यांनी देशातील रक्तदात्यांना रक्तदानासाठी आवाहन केले आहे. समाजसेवा ही अविरत चालू राहणारी घटना आहे. आपल्या देशाप्रती असलेला सेवाभाव, स्वातंत्र्य चळवळीत हुतात्मा झालेले क्रांतिकारक, स्वातंत्र्य सैनिकांना अभिवादन आणि स्वातंत्र्याचा जागर करण्यासाठी एकदा अवश्य रक्तदान करावे. देशाप्रती असलेली आत्मीयता, देशप्रेमाची भावना जागृत करून अंमलात आणण्याचे एक माध्यम म्हणून रक्तदानाकडे पाहूया, असे यावेळी प्रफुल भोयर म्हणाले. रक्तदाते वाढीस लागणे हेच खरे प्रफुल भोयर यांच्या कार्याचे यश आहे.

No comments:

Post a Comment

कायदेविषयक साक्षरता आणि जनजागृती अभियान....

प्रयत्न करुया सगळे संपविण्या निरक्षरता गरज आहे काळाची कायदे विषयक साक्षरता  ◆ कायदेविषयक  साक्षरता आणि  जनजागृती अभियान यवतमाळ:- लक्ष्मीबाई ...