28 December 2021

अमोलकचंद महाविद्यालयात रक्तदान शिबीर संपन्न...

रक्तसंकलन:- श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रक्तपेढी यवतमाळ
◆ ६६ रक्तविरांनी केले रक्तदान














 

24 December 2021

जपणूक जागतिक वारसा स्थळांची...

जपणूक जागतिक वारसा स्थळांची

  ◆ सामाजिक जबाबदारी - आपली


      नमस्कार राजेहो ! काय म्हणता ? कसे आहेत सर्वजण ? मजेत ना ! मी बी मजेत आहे !
     मला न आज तुम्हाला लईच खास गोष्ट सांगायची आहे.  राजे हो ! हल्लीच्या काळात पर्यटनाला आलेल्यांची तुफान गर्दी दिसते. निसर्गप्रेमी,  निसर्ग अभ्यासक अशी सर्वांचीच हजेरी राहते. राजेहो ! मजाच मजा नाही का ?
     जगात अनेक वारसा स्थळं आहे राजेहो. त्यातच भारतामध्ये सर्वाधिक वारसा स्थळ आहे. अन त्याला निसर्गाची साथ म्हणजेच आसमंताला भिडणारे भले - भले डोंगर, दऱ्या - खोऱ्या अन समुद्राचं - नद्यांचं निळशार पाणी, लईच झकास दिसते राजेहो ! पण गेल्या काही वर्षांपासून या सौंदर्याला नजरच लागली आहे जणू ! लोकांनी बेसुमार वृक्षतोड केली, अतिक्रमण केली, शिकारीचे प्रमाण वाढवले. जो-तो पर्यटनाला येतो अन दगडाने त्या भिंत्यांवर आपले नाव लिहून ठेवतो. त्यामुळे त्यांचं सौंदर्य कमी होत आहे. वनस्पती व प्राण्यांच्या कित्येक प्रजाती नष्ट होत आहे. 
     "राजेहो  जागतिक वारसा म्हणजे काय" ? तर ज्या स्थळांना, वास्तुंना सांस्कृतिक, भौगोलिक व ऐतिहासिक दृष्ट्या महत्व आहे. ही स्थळे देशाचा मौल्यवान खजिना आहे. त्यासमान दुसरी वास्तू तयार करणे कठीणचं.
         राजेहो ! म्हणूनच या प्राचिन इतिहासाच्या परंपरेच्या पाऊलखुणा जपुयात. तो जतन करणे, त्यांचे रक्षण करणे हे आपले प्रत्येकाचे कर्तव्य आहे .

चला आपला वारसा जतन करण्याचा वसा घेऊया.

देशाच्या नाव-लौकिकात भर घालुया, 
ठेवा वसुंधरेचा जपुन ठेवू या ।।

          शब्दांकन:- प्रफुल्ल भोयर यवतमाळ/ ७०५७५८६४६८

◆  आकाशवाणी कार्यक्रम "राजेहो" यामध्ये प्रसारीत...

06 December 2021

भेट- नगरसेवक नितीन दादा यांच्या समावेत..

 


◆ जिल्हा प्रमुख तथा नगरसेवक नितीन दादा मिर्झापुरे यांच्या समावेत...
@यवतमाळ

राजीव विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय झरी येथे वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

 राजीव विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय झरी येथे वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

◆ युवकांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी स्पर्धा ठरतात महत्वाच्या


      भारत हा युवकांचा देश आहे. बलशाली देशासाठी गावकुसरातील युवकांचा विकास होणे गरजेचे आहे. त्यासाठी युवकांमधील सामर्थ्यक्षमतेचा शोध घेणे महत्वाचे ठरते. 

युवकांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी स्पर्धा महत्वाच्या ठरतात. 

          या अनुषंगाने नेहरू युवा केंद्र व युवा कार्यक्रम आणि खेल मंत्रालय व राष्ट्रीय सेवा योजना युनिट यांच्या संयुक्त विध्यमाने "देश भक्ती आणि राष्ट्र निर्माण" या विषयाला अनुसरून 'सबका साथ सबका विकास सबका विश्वास सबका प्रयास' या विषयावर  तालुका स्तरीय भाषण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या औचित्यावर राजीव विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय झरी येथे नेहरू युवा केंद्र यवतमाळ तर्फे तालुका स्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

           वक्तृत्व स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक शुभम विलास राऊत द्वितीय सांची तेलतुंबडे आणि तृतीय क्रमांक सुयश तोटेवर यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

          यावेळी महाविद्यालयाचे  विठ्ठल पाईलवार सर यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले. तर प्रास्ताविक प्रा.. पोलचेट्टीवार सर यांनी केले. प्रा. फाळके सर यांनी सूत्रसंचालनाची धुरा यशस्वीरीत्या सांभाळली. तर आभार प्रदर्शन  नेहरू युवा केंद्राच्या युवा स्वयंसेविका कु. प्रविणा भोयर यांनी केले. सदर कार्यक्रमासाठी . प्रेम नरडलवार सर, कापनवार सर, पिंगे सर, विपीन पाईलवार सर, मंगेश मडावी यांनी मोलाचे सहकार्य केले.

        युवकांमध्ये देशभक्ती व राष्ट्रप्रेम जागृत व्हावं, आत्मपरिक्षणातून युवकांचा विकास व्हावा. युवकांनी भविष्याची योग्य वाट चोखाळावी आणि आपले ध्येय गाठावे. याविषयी महाविद्यालयाच्या प्राध्यापकांनी सखोल मार्गदर्शन केलं. स्वयंसेविका कु. प्रविणा भोयर, प्रफुल भोयर तसेच युवक विद्यार्थी व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.









◆ जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा
@अमोलकचंद विधी महाविद्यालय यवतमाळ
10/12/2021












कायदेविषयक साक्षरता आणि जनजागृती अभियान....

प्रयत्न करुया सगळे संपविण्या निरक्षरता गरज आहे काळाची कायदे विषयक साक्षरता  ◆ कायदेविषयक  साक्षरता आणि  जनजागृती अभियान यवतमाळ:- लक्ष्मीबाई ...