20 December 2024
मानसिक आरोग्य बळकटीसाठी ध्यानाची कास धरावी
18 December 2024
अधिक सक्षम होण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचे तंत्रज्ञान समजून घेणे आवश्यक....
14 December 2024
राष्ट्रीय लोकअदालतीत 16 हजारावर प्रकरणे सामंजस्याने निकाली....
राष्ट्रीय लोकअदालतीत 16 हजारावर प्रकरणे सामंजस्याने निकाली
◆ प्रकरणांचे तडजोड मुल्य 23 कोटी 67 लाख
◆लोकअदालतीचे सावरला 11 जोडप्यांचा संसार
◆पाच व दहा वर्ष जूनी 116 प्रकरणे निकाली
यवतमाळ, दि.16 (जिमाका) : जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीस प्रचंड प्रतिसाद लाभला. यामध्ये 16 हजार 259 प्रकरणे आपसी तडजोडीने निकाली निघाली. सर्व प्रकरणांचे तडजोड मूल्य 23 कोटी 67 लाख ईतके आहे. विशेष म्हणजे 11 जोडप्यांचा संसार लोकअदालतीने सावरला.
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीस तथा जिल्हा विधीसेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष नागेश न्हावकर यांच्या मार्गदर्शनात लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. त्यांच्याच हस्ते झाडाला पाणी देवुन लोकअदालतीचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव के.ए. नहार, जिल्हा न्यायाधीश-१ अ.अ.लउळकर, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष संजय जैन तसेच जिल्हा न्यायालयातील सर्व न्यायीक अधिकारी, कर्मचारी, पक्षकार व ईतर मंडळी उपस्थित होती.
लोकअदालतमध्ये न्यायालयात प्रलंबित व वादपुर्व प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्याचबरोबर वेगवेगळ्या राष्ट्रीयकृत बँका, ग्रामपंचायत कराची वादपुर्व प्रकरणे ठेवण्यात आली होती. प्रकरणे आपसी तडजोडीने मिटविण्यासाठी न्या.नागेश न्हावकर, न्या.के.ए. नहार तसेच सहकारी न्यायाधीशांनी अथक परिश्रम घेतले. वेळोवेळी शासकीय अधिकारी, वकील, पक्षकार, विविध संस्था व राष्ट्रीयकृत बँकेतील अधिकारी, पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या व त्यांना राष्ट्रीय लोकअदालतचे महत्व पटवुन दिले.
लोकअदालतमध्ये स्वच्छेने व सामंजस्याने वाद अंतिमरित्या मिटविता येते याची खात्री पटल्यामुळे जिल्ह्यामध्ये २ हजार ९४६ प्रलंबित प्रकरणे व १३ हजार ३१३ वादपूर्व प्रकरणे असे १६ हजार २५९ प्रकरणे आपसी तडजोडीने निकाली निघाली. निकाली प्रकरणांचे तडजोड मुल्य २३ कोटी ६७ लाख ३१ हजार ७४२ आहे. विशेष मोहिमेंतर्गत १ हजार ३२१ प्रकरणे निकाली काढण्यात आली. लोकअदालतमध्ये ११ जोडप्यांचा संसार सावरला. विशेष म्हणजे ३० वर्षे जुने प्रकरण महागांव न्यायालयात निकाली काढण्यात आले. तसेच ११६ हुन अधिक पाच वर्षे व दहा वर्षे जुनी प्रकरणे समझोत्याने निकाली निघाली.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, तालुका विधी सेवा समित्या तसेच सर्व न्यायाधीश व कर्मचारी यांनी राष्ट्रीय लोकअदालत यशस्वी करण्याकरीता परिश्रम घेतले. जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक, जिल्हा सरकारी वकील, सहायक सरकारी वकील, उपजिल्हाधिकारी, भू-अर्जन अधिकारी, बेंबळा प्रकल्पाचे अधिकारी व सहकारी, बँका, संस्था, विमा कंपन्याचे अधिकारी, पोलिस अधिकारी, एसटीचे विभाग नियंत्रक, वकील मंडळी आणि स्वयंसेवक तसेच जिल्ह्यातील सर्व न्यायालयीन कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
07 December 2024
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणतर्फे मध्यस्थी जनजागृती कार्यक्रम....
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणतर्फे मध्यस्थी जनजागृती कार्यक्रम
त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष एन. व्ही. न्हावकर यांनी मध्यस्थी प्रक्रियेबाबत उदाहरण देतांना सांगितले की, वाद मिटविण्यासाठी मध्यस्थी प्रक्रिया खुप महत्वाची आहे. दोन्ही पक्षकारांमध्ये तडजोड करण्यासाठी प्रशिक्षित मध्यस्थ असणे आवश्यक आहे. मध्यस्थीमुळे दोन्ही पक्षकारामध्ये वाद हा सहजासहजी मिटू शकते. तसेच वकीलांनी पक्षकारांना मध्यस्थी मध्ये सामावून घ्यायला पाहिजे. मध्यस्थी प्रक्रियेमध्ये वकीलांची भुमिका खुप महत्वाची असते. तडजोडीकरीता वकीलांनी जास्तीत जास्त सहभाग घेऊन मध्यस्थी प्रक्रियेमध्ये काम करावे व दोन्ही पक्षकारामध्ये तडजोड कशाप्रकारे होऊ शकते हे पाहावे. त्यामुळे मध्यस्थी प्रक्रिया प्रभावीपणे काम करु शकते, असे यावेळी त्यांनी आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनामध्ये सांगितले.
कार्यक्रमाचे आभार सचिव के ए. नहार यांनी मानले. संचलन ९ वे सह दिवाणी न्यायाधीश क. स्तर श्रीमती आर. एस. मोरे यांनी केले.
कायदेविषयक साक्षरता आणि जनजागृती अभियान....
प्रयत्न करुया सगळे संपविण्या निरक्षरता गरज आहे काळाची कायदे विषयक साक्षरता ◆ कायदेविषयक साक्षरता आणि जनजागृती अभियान यवतमाळ:- लक्ष्मीबाई ...
-
जिल्हाधिकारी यांच्या हस्ते प्रफुल भोयरच्या विश्वात्मक औदार्य चे विमोचन बळीराजा चेतना भवन येथे ग्राहक दिन साजरा ग्राहकाला केंद्रस्थ...
-
यवतमाळ साहित्य मंच तर्फे प्रफुल्लचा गौरव... रक्तदानाच्या उल्लेखनिय कामगिरीसाठी दिला पहिला सामाजिक पुरस्कार यवतमाळ जिल्हा साहित्य...