घडविली रक्तवीर ने महान सेवा
◆ महाराष्ट्राच्या युवकाची अनोखी चळवळ
विश्वाच्या अफाट पसाऱ्यात आज कुणाला कुणासाठी वेळ नाहीच. जो तो आपापल्या कार्यात मग्न आहे. स्वार्थासाठी ओळ्खणाऱ्यांची संख्या तर ढीगभर दिसते. त्यात आपल काम झाल्यावर विसरून जातात. पण रक्तवीर बहुउद्देशीय संस्थेचे पदाधिकारी कुणाची ओळख नसताना, कुणाचं नाव माहीत नसताना आणि कुठलीच अपक्षा न करता मदतीसाठी तयार होतात.
आज मुकुटबन येथील रक्तवीर बहुउद्देशीय संस्थेचे एक मोठया वटवृक्षात रूपांतर झाले आहे. त्यांची काम करण्याची पद्धत तरुणांना जगणं शिकवून जाते आणि समाजात प्रेरणा म्हणून रक्तवीर कायम उरते.
आपल्या संस्थेतर्फे या तरुणांनी महाराष्ट्रात रक्तदानाची एक चळवळ राबविली. याच यशस्वरूप अर्थातच ती यशस्वी ठरली. बऱ्याच वर्षापासून करत येत असलेल्या रुग्ण सेवेमुळे या संस्थेच्या हातून महान सेवा घडली आहे. ज्यामुळे अनेकांचे प्राण वाचले. रक्तवीर ने सुरुवातीपासूनच रक्तदाते देण्याचा विक्रम केला आहे. संपूर्ण भारतभर रक्तविरची व्याप्ती आहे. हजारो रक्तदाते देऊन ते गरजू रुग्ण जीव वाचविण्यात अग्रेसर आहे. यामध्ये प्रामुख्याने सहकार्य करणारे गणेश मुद्दमवार, प्रफुल भोयर, प्रियल पथाडे, जयपाल उत्तमानी, अभिषेक ठाकूर, स्वप्नील अलगदिवे,सागर इलकर, राहुल कुरझडकर, चैतन्य तेलरांधे, शुभम निपाने, यशवंत गिरी, सुनिल नलगंटीवार, मोनेश्वर खंडरे, भुषण फरांडे हे आहेत.
यावेळी यांनी 75 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त भारतातील सर्व रक्तदात्यांना रक्तदानासाठी आवाहन केले आहे.